सोलापुर : मागील दोन दिवसापासून सोलापुर जिल्ह्यातील दोन जुळ्या बहिणींनी एका मुलाशी विवाह केल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत सोशल मीडियावर या विवाह दाम्पत्यांचे फोटो, व्हि़डीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र या विवाहाचं महिला आयोगाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
सोलापुर येथील एका तरूणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरू आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापुर पोलीस अधिक्षक यांनी उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
“उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
त्याचबरोबर केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा असे आदेश रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आता या विवाहीत दाम्पत्यांवर कशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
दरम्यान, मागील दोन दिवसापासून या जुळ्या बहिणींच्या लग्नाची गोष्ट प्रचंड व्हायरल झाली. या दोन मुलींची नाव रिंकी आणि पिंकी असून संबंधित तरूणांनी त्या मुलींच्या आईला आपल्या गाडीतून रूग्णालयात घेऊन गेल्यावर त्यातील एका मुलीचं प्रेम तरूणांवर जडलं. मात्र दोन्ही मुली एकमेकांशिवाय राहु शकत नसल्याने दोन्ही मुलींनी संबंधित तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या या लग्नाची गोष्ट सगळीकडे चर्चेली जात आहे.
सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 4, 2022
Read also
- “आमच्याकडे एक सुशी ताई, पण वरच्या मजल्यावर घनदाट अंधार”; मनसेची खोचक टिका
- “शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात
- “आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे
- “सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
- “आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला