मुंबई : बिअरवरील उत्पादन शुल्कात दरवाढ केल्याने बिअरच्या विक्रित घट होत आहे. यामुळे बिअरच्या विक्रिचा आलेख व परिणामी मिळणारा शासनाला महसूल कमी होत आहे. यातच बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यांपेक्षा जास्त असल्याने बिअरच्या किंमतीमुळे ग्राहकर बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नसल्याचं सरकारच्या निर्देशनात आले आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिकास्र् सोडलं आहे.
हेही वाचा…“ललित पाटीलचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा तपास थांबवला जाईल,” आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
सरकारने नेमलेल्या समितीत अपर मुख्य सचिव ( राज्य उप्तादन शुल्क ), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, राज्य उप्तादन शुल्क आयुक्त, उपसचिव, ऑल इंडिया ब्रुवरीज असोशिएसनचा प्रतिनिधी, अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पाच जणांची समिती स्थापन केली आहे. ही समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.
शाळांची होत असलेली दुरावस्था, आजारी आरोग्य व्यवस्था महिलांवर वाढलेले अत्याचार यांसारख्या महत्वाच्या विषयांवर समिती नेमणे सोडून महायुतीने बीअरचा खप कसा वाढवावा यासाठी समिती नेमली आहे. एकीकडे राज्यात कोटींचे ड्रग्ज जप्त होत आहे. रूग्णालयामधून ड्रग्ज माफिया काम करतात. तर दुसरीकडे राज्यात बीअरची विक्री कमी का होते याचा अभ्यास करायला राज्य सरकारने समिती नेमली आहे. या राज्यातील सरकारचे प्राधान्य कशाला आहे? राज्यातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अधिक जास्त कशी अडकेल याचा अभ्यास राज्य सरकार करणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी
सरकारच्या या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी टिका केली आहे. महाराष्ट्रात बिअरची कमी विक्री का होत आहे, याचा अभअयास करून महाराष्ट्रात बिअर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल. यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच अधिकार्यांची समिती नेमली आहे. मराठा शाळा वाचवल्या पाहिजेत. यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे. रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या साधू संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बिअर ओतनार सरकार वाटतं. जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. पिओ बियर….करो सरकार को चिअर अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“४०० जातींच्या OBC समाजावर गदा आणल्यास, मराठा आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन करू,” OBC महासंघाने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…“दिवाळी आधी राज्यातील राजकीय वातावरण बिघडू शकतं”, बड्या नेत्यानी व्यक्त केलं भाकित
हेही वाचा…मराठवाड्यात आघाडीच्या जागा वाटपाचा फॉम्युला ठरला? लोकसभा निवडणुकीत तगडे उमेदवार देणार
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचे नवे वेळापत्रक दसऱ्यानंतर, नार्वेकर करणार पुन्हा दिल्लीवारी
हेही वाचा…जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार, मराठा आरक्षण देण्याबाबत फडणवीसांचं मोठं विधान