अहमदनगर : महाविकास आघाडी पाडून शिंदेंनी भाजपसोबत युती केली. त्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सरकारमध्ये सत्तेत सहभागी झालेत. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण फार बदलून गेली आहेत. यातच आता या सर्व पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
अजित पवार विरोधी पक्षनेते होते. तेव्हा ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करत होते. अजित पवार यांनी कधीच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले नाही. त्यांना त्यांनी मोकळे सोडले. या सर्व गोष्टी आम्हाला जाणवत होत्या. काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास आम्हाला येत होता. असं बाळासाहेब थोरांतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा आम्हाला नवीन धक्का मिळाला. काहीतरी होणार याची आम्हाला चाहूल लागली होती. तेव्हाच अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबचत गेलेल्या आमदारांचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. काहीतरी शिजत होतं आणि आम्हाला त्याचा वास येत होता. कारण आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित चांगलं काम केलं आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना धोक्याची घंटा, कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
हेही वाचा…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार, २२ जुलैला ठाण्यात ठाकरेंची सभा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
हेही वाचा…शिंदे अन् भाजपकडील महत्वाची खाती काढली, राष्ट्रवादीच्या वाट्याला खाती