पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता खालावल्याने शरद पवार यांनी हे पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित शरद पवार यांनी खंत देखील व्यक्त केली आहे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी हे पत्र लिहिलं आहे.
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही.
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
या कारणास्तव राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या.
राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्रीमहोदयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या… pic.twitter.com/QM7Bfvf71t
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
हेही वाचा…शिंदे अन् भाजपकडील महत्वाची खाती काढली, राष्ट्रवादीच्या वाट्याला खाती
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला