ठाणे : शिवसेनेच्या फुटीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात त्यांनी विदर्भातून केली असून त्यांनी अमरावती आणि नागपुर येथे जाहीर सभा घेऊन शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येत्या २२ जुलैला उत्तर भारतीयांचा सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून शिंदेंवर काय बोलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
आगामी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिक मतदारांना वळवण्याचा राज्यातील प्रमुख पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. यातच आता येत्या २२ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी उद्धव ठाकरे हिंदी भाषिक लोकांना संबोधन करणार आहेत.
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “
दरम्यान, ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बाल्लेकिल्ला समजला जातो. ठाण्यातूनच एकनाथ शिंदे विधानसभेवर निवडून आले आहेत. तसचे शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील याच भागातून खासदार आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. त्यातच शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य अभ्यास करून, प्रांत, भाषा संस्कृती, मुंबईकरांचे प्रश्न या आदी विविध मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याच समजत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
हेही वाचा…शिंदे अन् भाजपकडील महत्वाची खाती काढली, राष्ट्रवादीच्या वाट्याला खाती
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य