नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधात लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी नोटीस सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवली आहे. काल ठाकरे गटातील नेते सुनील प्रभू यांनी अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सरन्यायाधीश धंनजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली.
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
सुनील प्रभू यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे. याआधी १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात ११ ऑगस्ट म्हणजे ९० दिवसांचा कालावधी लागू शकतो. परंतु जर गुंतागुंतीचे प्रकरण असेल तर ९० दिवसांची आवश्यकता लागू शकते. परंतु आता राहुल नार्वेकर यांनी कोर्टाने याप्रकरणाबाबत नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक दिवसांचा कालावधी गेला, परंतु अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. यातच आता भाजपने राष्ट्रावादीला देखील सोबत घेतल्याने शिंदेंचं महत्व कमी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे कोर्टाच्या नोटीशीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार, २२ जुलैला ठाण्यात ठाकरेंची सभा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
हेही वाचा…शिंदे अन् भाजपकडील महत्वाची खाती काढली, राष्ट्रवादीच्या वाट्याला खाती
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान