पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघातील जागा जिंकण्यासाठी राज्यात मोठी फिल्डिंग लावली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या मतदार संघावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ही जागा जिंकेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच या जागेवर मनसे देखील डोळा ठेवून राहिला आहे. पुण्यातील फायरब्रॅंड नेते वंसत मोरे यांच्याकडे देखील मनसेने मोठी जबाबदार दिली आहे.
“शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध
खासदार सुप्रिया सुळे यांनी सलग दोन ते तीन वेळा बारामती लोकसभा मतदार संघातून आपलं वर्चस्व गाजवलं आहे. बारामतीची जागा जिंकण्यासाठी येणाऱ्या काही काळात केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. त्याआधी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर जात आहेत. त्याठिकाणी ते विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर निर्मला सितारमण यांच्या दौऱ्याची देखील ते पाहणी करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल
येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप शिंदे सेनेसोबत युती करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त आणि विधानसभा निवडणुकीत युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळवू, असा निर्धार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे हे ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्याकडे केंद्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे काही जबाबदारी नसेल. तसेच बारामतीची जागा 2024 मध्ये भाजपच्या ताब्यात असेल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे.
“आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वंसत मोरे यांच्याकडे निवणुक निरिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि मनसेकडून बारामती लोकसभा मतदार संघाला सुरूंग लावण्याचं काम सुरू आहे. अशा चर्चा देखील राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदार संघावर कोण विजयी पताका फडकावेल. त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
- “दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
- “राज ठाकरेंच्या भेटीसाठी जावं, राजकीय युती करू नये”; भाजपला रामदास आठवलेंचा सल्ला
- काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान