मुंबई : नववर्षाच्या पहिल्या दिवशी ठाकरे सरकारकडून मुंबईकारंना एक मोठं गिफ्टच मिळालं. आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरविकास विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील 500 स्क्वेअर फूट पर्यंततच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून 500 चौ. फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: 16 लाख कुटुंबांना लाभ होईल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 2017 च्या मुंबई मनपा निवडणुकीत आपण एक वचननामा दिला होता. इतर देतात ते जाहीरनामा आणि आपण देतो ते वचननामा. या वचननाम्यातील बहुतांश वचन आपण पूर्ण केले आहेत. त्यातील एक वचन म्हणजे मुंबईतील 500 स्क्वेअर फूट घरांच्या मालमत्ता कर रद्द करणं. हे महत्त्वाचं वचन त्या वचननाम्यात होतं. मालमत्ता कर रद्द करण्याच्या निर्णयात ज्यांचा ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचे धन्यवाद. या निर्णयामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे मला खूप आनंद होत आहे. वचनाला आपण जागलो आहोत. तत्काळ या निर्णयाची घोषणा नाही तर मला अंमलबजावणी हवी आहे. जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, मुंबईकरांच्या 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिले होते त्यानुसार आपण निर्णय घेत आहोत. हा निर्णय मुंबईकरांसाठी खूपच दिलासादायक आहे. 500 चौरस फूटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर सरसकट माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय महाराष्ट्रातच नाही तर देशातही कुणी घेतला नसेल. या निर्णयामुळे मुंबईतील 16 लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल.
Read also:
- सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातात वाघाची शेपटी; व्हायरल पोस्टव्दारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
- राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
- “गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित