नाशिक : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. यातच आज चांदवड येथे राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो लोकांच्या संख्येने राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. या मेळाव्यातून शरद पवारांसह संजय राऊत, जयंत पाटील यांनी देखील भाजपवर सडकून टिका केलीय.
हेही वाचा..विजय शिवतारेंवरून शिंदेंना इशारा, परांजपेंना नरेश म्हस्केंनी सुनावलं
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार जाहिरात बाजी सुरू केली आहे. यावर जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, सध्या सर्वत्र मोदी की गॅरंटी असे कॅम्पेन चालवले जात आहे. जाहिरातींमध्येही याचा प्रचार केला जात आहे. पण भाजपच्या गॅरंटीची परिस्थिती चायनीच मालासारखी आहे. चले तो चांद तक नही तो शाम तक असा हा प्रकार असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला.
हेही वाचा…भाजपचा माजी खासदार शरद पवारांकडून निवडणूक लढणार; राजकीय हालचालींना वेग
पुढे बोलतांना ते म्हणाले की, संपुर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात अस्वस्थ जर कोणी असेल तर तो शेतकरी आहे. यापुर्वी देखील देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला होता. त्यावेळी ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण दिल्लीचं सरकार हललं नाही. आता पुन्हा एकदा आमचा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभुत किमंत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको पण आधारभुत किमंत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या. असेही आव्हान जयंत पाटलांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा.“तिकीट कापल्यानंतर जगदीश मुळीक यांची सोशल मीडियावर पोस्ट”, म्हणाले…
हेही वाचाविदर्भात भाजप धक्कातंत्राचा वापर करणार ; ‘या’ खासदारांचा पत्ता कट होणार ?
हेही वाचा.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरेंच्या ‘या’ विद्यमान खासदाराला भाजपकडून तिकीट
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी मोहोळांवर शिक्कामोर्तब ; मुरलिधर मोहोळांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुंडेंचं पुनर्वसन, मोहाळांना संधी, खडसेंवर विश्वास, तर मुनगंटीवारांना बळजबरी ; भाजपच्या २० उमेदवारांची यादी जाहीर