जालना : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला आज हिसंक वळण लागलं आहे. धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी जालना येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयाची मोठी तोडफोड केली असून मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासोबत आता धनगर आरक्षणाचाही मुद्दा चांगलाच पेटत आहे.
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला अचानक हिंसक वळण लागल्याने कार्यालयाचं गेट तोडून आंदोलक आत घुसले. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड केली. तसेच खिडक्यांच्या काचा देखील यावेळी फोडण्यात आल्या.
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असता आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे परिसरात एकच मोठा गोंधळ बघायला मिळाला. यातच आता मराठा आरक्षणासारखाच आता धनगर आरक्षणाचाही मुद्दा राज्यात पेटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ