पुणे : चिंचवड आणि कसब्यातील निवडणुक ही फक्त शहरांपुरती मर्यादीत न राहता देशातील राजकीय वातावरण निर्मिती यामधून होऊ शकते. त्यासाठी आपण सर्वांनी एकाच भावनेतून काम केलं पाहिजे. सत्तांतरण झाल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर उतरून भाजपला रोखण्याची संधी मिळत आहे. या निवडणुकांमधून असा सत्क्षाकार झाला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांना देखील याची दखल घेतली गेली पाहिजे. तसेच सध्याचं भ्रष्ट सरकार कसं काम करतंय. ते या निवडणुकीच्या निकालामधून नांदी दिसणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून आपल्या उमेदवाराला विजयी करून द्या. असं शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. आज चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
सुरूवातीपासून चिंचवडची जागा आपल्याला मिळणार अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु शिवसेना प्रमुखांनी जो काही आदेश दिला. त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत. तसेच आम्हाला या सरकारचा वचपा घ्यायचा आहे. ज्या पक्षातील नेत्यांनी आमचं चिन्ह गोठवण्याचं काम केलं आहे. पक्ष संपवण्याचं पाप करीत आहे. त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक मतदार त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असंही सचिन अहिर यांनी म्हटले.
हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
तसेच तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांची देखील या पोटनिवडणुकांमध्ये कसोटी लागणार आहे. कारण येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकांमध्ये एबी फार्म देण्यासाठी हे नेते व्यासपीठावर बसले आहेत. असं म्हणत त्यांनी माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुखांनाही इशारा दिला. पुणे , चिंचवड महापालिकेत खुप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं सत्ताधारी भाजपमधलेच नगरसेवक सांगत आहेत. परंतु त्याची चौकशी करण्याची हिंमत राज्य सरकार दाखवत नाही. परंतु तिकडे मुंबईमध्ये चांगलं काम सुरू असतांना चौकशी केली जाते. अशी टिका देखील अहिर यांनी भाजपवर केली.
दरम्यान, सुरूवातीला राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राहुल कलाटे नाराज झालेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी देखील फोन केला. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज तसाच ठेवत निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला. त्यावर जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा, अशी टिप्पणी सचिन अहिर यांनी राहुल कलाट्यांवर केली.
Read also
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
- हेही वाचा..जातीयवादाच्या राजकारणाला धुडकावत ब्राह्मण समाज देणार हेमंत रासने यांना साथ ?
- हेही वाचा..“ठाण्यात राष्ट्रवादीला मोठ खिंडार, 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
- हेही वाचा..““गुलाल आपलाच..! सगळ्या पक्षाची ताकद लावा अन् रविंद्र धंगेकरांना विजयी करा”, अजित पवार
- हेही वाचा..“पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात, चिंचवडमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार