नागपूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात हजर झाले. सुरूवातीला त्यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची भेट घेऊन कार्यालयात दाखल झालेत. त्यानंतर मलिकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच ज्यावेळी मलिक सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाजूच्या बाकावर बसले त्यानंतर अंबादास दानवेंनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. यातच आता नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका. अशी थेट मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे अजित पवारांकडे केली आहे.
हेही वाचा…नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी? नवाब मलिक सभागृहात बसल्यानंतर मोठा गोंधळ
अजित पवारांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे.
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
दरम्यान, नवाब मलिक प्रकरणावरून आज सभागृहात दानवे आणि फडणवीसांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. सभागृहात देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याचे सत्ताधारी म्हणाले होते. ते आता त्यांनी स्पष्ट करावे. असं अंबादास दानवेंनी म्हटलं. त्यावर आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नसल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केला. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळला. तर शोक प्रस्तावानंतर विधिमंडळाचं कामकाज उद्या अकरापर्यंत स्थगित करण्यात आलं.
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?