विरेश आंधळकर, मुंबई : जून २०२२ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने ऐतिहासिक बंडखोरीसह राजकीय महानाट्य पाहिले. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे आज भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री आहेत. तर सरकारच्या वर्षपूर्ती मुहूर्तावर आणखीन एक नाट्य राज्यातील जनतेला पहायला मिळाले असून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. कालपर्यंत विरोधी पक्षनेते असणारे अजित पवार आज सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री बनले. काल एकाच दिवसात राष्ट्रवादीतून आलेल्या ९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदेंचे बंड असो कि अजित पवारांनी सोडलेली काका शरद पवारांची साथ, या सर्व नाट्याचे महानायक मानले जातायत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?
२०१९ साली एकत्र लढूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला. १०६ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असताना देखील भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. या काळामध्ये पक्षातील सर्व आमदार फडणवीस यांचे एकमुखी नेतृत्व मान्य करत भाजपसोबत प्रामाणिक राहिले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या राजकारणाचा बदला घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वासोबत फडणवीसांनी खेळी केली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेना आमदार ठाकरेंपासून वेगळे करण्यात आले. पुढे त्याच शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षांच्या दुष्काळानंतर सत्तेत आल्याने भाजपच्या आमदारांमध्ये नवीन आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आज राष्ट्रवादीतील प्रथापितांना सोबत घेत आपल्याच पक्षातील आमदारांची भाजपने कोंडी केल्याची चर्चा आहे.
रुग्णशय्येवर असतानाही आमदारांनी मानला पक्षादेश
महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथीची बीजे जून २०२२ मध्ये रोवली गेली. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही आमदारांचे मतदान भाजपने आपल्या पारड्यात पाडून घेतले, तर पुढे झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील विरोधकांमध्ये फुट पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळालं. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या मतदानावेळी भाजपच्या एकाही मताला धक्का लागला नाही. उलट दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या रुग्णशय्येवर असताना देखील अॅम्ब्यूलन्समधून येत पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलं. त्यावेळी फडणवीस यांच्यासह पक्षादेश असल्याने आपण आल्याचं दोघांनीही सांगितलं होत. आपला पक्ष विरोधी बाकावर असताना देखील निष्ठा काय असते? हे या आमदारांनी दाखवून दिल.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
राष्ट्रवादीला मांडीवर घेतल्याने भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्याकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या. या काळामध्ये सत्तेतील शिवसेनेसह कॉंग्रेस आणि भाजपच्या आमदारांना निधी देताना त्यांनी हात आखडता घेतल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होत. याच मुद्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. आज भाजपच्या राजकीय खेळीमुळे त्यांची देखील अजित पवारांसह सत्तेत थांबण्याची अपरिहार्यता आहे. मात्र या सर्व खेळात “सहन ही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी परिस्थिती भाजप आमदारांची झालीय. चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत अजित पवारांनीच भाजपच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केलं होत.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसांच्या महत्वकांक्षेमुळे भाजप आमदारांचा बळी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला केवळ शिंदे आणि फडणवीसांनी राज्याचा कारभार हाकला. पुढे १८ मंत्रांचा शपथविधी पार पडला. गेल्या वर्षभरापासून मंत्री पदाची स्वप्ने पडणाऱ्या शिवसेना आणि भाजप आमदारांचा केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षेमुळे स्वप्नभंग झाला आहे. परंतु यंत्रणांचा आपल्या नेतृत्वाकडून होणारा योग्य वापर पाहता, हे आमदार एक शब्दही बोलू शकणार नाहीत. मात्र फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला