मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर येथील झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पर्यंत २० – २५ आरोपीची ओळख पटली आहे. यातच २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होत आहे. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या संपुर्ण राज्यात सभा होत आहेत. या सभेला अजित पवार, नाना पटोले आणि यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. परंतु त्याआधी संभाजीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळं वातावरण बिघडेल गोंधळ होईल. असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. असं त्यावर बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
तसेच महाविकास आघाडीच्या सभेवर तसेच छत्रपती संभाजीनगर शहरावत गृहमंत्री देवेंंद्र फडणवीस तसा निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री यावरती लक्ष ठेऊन आहेत. असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीची सभा होणार का ? हा मोठा सवाल निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांनी या सभेला काही अटी देखील घालून दिल्या आहेत.
Read also
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल