छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे गोंधळ घालणारे येथे गोंधळ घालणारे लोक घातक आहेत. ते कुठल्याही समाजाचे असो, अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे. अशा घटना झाल्यावर काही विरोधी गटातील राजकीय नेते राजकारण करून समाजाला भडकवण्याचे काम करतात. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सध्या हे शहर चर्चेत आलं आहे. आज रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
इम्तियाज जलील यांनी ज्याप्रकारे विधान दिलं, त्याचा परिणाम युवा वर्गावर झाला आहे. आज कोणी कितीही नकार देत असले, तरी एका विशिष्ट युवा वर्गाने हे घडवून आणलं आहे. आमचं एवढचं म्हणणं आहे, तेढ निर्माण करू नका. या घटनेची सुरूवात दोन गटात झाली, मग अवघ्या अर्ध्या तासात यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले? अर्ध्या तासात पेट्रोल बॉम्ब तयार होतात ?असं आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलंय.
Read also
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे