छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सध्या हे शहर चर्चेत आलं आहे. आज रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
एक संघटना राज्यात मागील काही महिन्यांपासून विविध जिल्ह्यात मोर्चे काढते, सभा घेते व भडकाऊ, चिथावणीखोर वक्तव्य करते, यातून सामाजिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. काही संघटनांनी पोलीसांकडे याबाबत तक्रार दाखली केलेली आहे परंतु पोलीस यंत्रणांचे हात बांधलेले आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी व प्रगत राज्य आहे, मुंबई व महाराष्ट्राचा जगभरात मोठा लौकिक आहे, त्याला गालबोट लावण्याचे काम काही संघटना धर्माच्या नावाखाली करत आहेत. सरकारने हे प्रकार तातडीने रोखले पाहिजेत पण सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते. असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”
महाराष्ट्रातील राजकीय अशांतता आणि द्वेषपुर्ण वक्तव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशोरे ओढले. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबद्दल जो शब्द वापरला तो आजपर्यंत कोणत्याही सरकारबाबत वापरलेला नाही, यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. शिंदे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
Read also
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे