मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकाराला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नव्या वर्षातील आमदार निधी वाटपाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गेल्या वर्षीचे आमदार निधी वाटपाचे आदेश देखील न्यायालयाने राज्य सरकारला देण्यात आले आहेत. निधीवाटपामध्ये पक्षपाती होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकरांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. यावर आता रविंद्र वायकर यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे सरकारला कोर्टाचा मोठा झटका..! कोर्टाने थेट आदेशच दिले, ठाकरे गटाच्या आमदाराची कोर्टात याचिका
आमदारांसाठी निधी वाटपासाठी ऐक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत आमदारांच्या विकास कामांच्या निधीवाटपावर काही आमदारांवर अन्याय झाल्याचं मी पालकमंत्र्यांच्या निर्दशात आणून दिलं होतं. त्यावेळी माझ्या कामांना स्थिगिती देखील देण्यात आली होती. तो मुद्दा मी विधानसभेत देखील उपस्थित केला होता. यातच काही आमदारांना ३० ते ३५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. आणि कामाला फक्त अडीच ते तीन कोटी रूपयाचा निधी दाखवण्यातत आला. तर मग असा भेदभाव तुम्ही का करत आहेत. त्यानंतर मग उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशी प्रतिक्रिया रविंद्र वायकर यांनी झी 24 तास मराठीला बोलतांना दिली.
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात अन्याय होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. पण आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकतं माप दिल्याबद्दल भाजप आणि शिंदे गटाच्या मनमानी कारभारावर उच्च न्यायालयाने चाप बसवला आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना निधी वाटपात असमानता म्हणून आोरडणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी सत्तेत येताच त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता स्थानिक विकास निधीचे वाटप कोणत्या निकषांनुसार केले? आणि कोणाच्या खात्यात हा निधी जमा केला? याचे दूध का दूध, पानी का पानी आता व्हायला हवे. अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
Read also
हेही वाचा…““उद्या तो कालावधी संपेल, मग तेव्हा आपल्याला समजेल की,” महिला आयोगाचा संजय शिरसाठांना इशारा
हेही वाचा…टोलवाढीच्या विरोधात ‘आप’चे आंदोलन, राज्य सरकारवर केला हल्लाबोल
हेही वाचा…गिरीश बापटाचं निधन, पुण्याच्या लोकसभा जागेंवर काॅंग्रेसचा दावा, अजित पवारांनी चांगलचं खडसावलं
हेही वाचा…आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जलतरण तलाव १ एप्रिलपासून सगळ्यांसाठी खुला
हेही वाचा…“नरेश म्हस्केंची अजित पवारांनी इच्चतच काढली, आलतूफालतू म्हणत म्हस्केंच्या ‘त्या’ आरोपांवर दिले उत्तर”