नाशिक : काल संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात राम नवमीच्या निमित्ताने सण साजरा करण्यात आला. यातच नाशिक येथील काळाराम मंदिरात देखील राम नवमीच्या दिनानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यातच छत्रपती संयोगिता राजे यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यांची पोस्ट देखील त्यांनी केली आहे. त्याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
छत्रपती संयोगिताराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणाऱ्या, परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सद्बुद्धि दे…. हीच आमची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. आपण सर्वजण देवाची लेकरे…..आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरें वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
दरम्यान, छत्रपती संयोगिताराजे यांनी केलेल्या कृतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. छ.संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरातील महंतांना छत्रपती शिवराय व शाहू महाराज यांचा करारी बाणा दाखवुन वस्तुस्थिती समाजासमोर मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.. प्रत्येकाला राजरोस अनुभव येतात मात्र लिहिण्या बोलण्याचे धाडस मोजके लोक करतात !आपणास मानाचा मुजरा असं अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तर छत्रपतीं शिवरयान बरोबर सनातनी मनुवादी असेच वागले छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बर झाले हे छत्रपतींच्या वारसं बरोबर झाले जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात अजुन कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींन च्या वारसांना ही वागणूक मिळते तर बिकीच्यांच काय बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो. असं आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
छ.संयोगिताराजे यांनी काळाराम मंदिरातील महंतांना छत्रपती शिवराय व शाहू महाराज यांचा करारी बाणा दाखवुन वस्तुस्थिती समाजासमोर मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.. प्रत्येकाला राजरोस अनुभव येतात मात्र लिहिण्या बोलण्याचे धाडस मोजके लोक करतात !आपणास मानाचा मुजरा@YuvrajSambhaji pic.twitter.com/zo0iYen0ZB
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 31, 2023
काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले… pic.twitter.com/F3FUCd8Qpi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
Read also
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले