मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय अशांतता आणि द्वेषपुर्ण वक्तव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशोरे ओढले. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे. तर काॅंग्रेसने देखील यावर जोरदार टिका करत हेट स्पीच देणाऱ्या व्यक्तींवर राज्य सरकार कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे. तर यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
राज्य सरकारने काय-काय कारवाई केली, हे सांगितल्यानंतर राज्य सरकारविरूद्ध अवमाननाबाबत नोटीस किंवा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही. याउलट इतर राज्यातही कोणकोणती वक्तव्ये केली जात आहेत आणि कसे महाराष्ट्राला पिनपॉईंट करण्याचा प्रयत्न होतो, हे सॉलिसिटर जनरल यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वसाधारण वक्तव्ये केले की, सर्व राज्यांनीच कारवाई केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कुठेही राज्य सरकारवर कोणताही निर्णय दिला नाही. कोणतीही अवमानना कारवाई केली नसताना, जे राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच समजत नाही. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही. त्यांना उत्तर देण्याची काही गरज नाही. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा……“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
दरम्यान, महाराष्ट्रातील सध्याच्या काही हिंदू संघटनांच्या सभांमधून एका पत्रकाराने महाराष्ट्र सरकार कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायाधीशांनी टिप्पणी देतांना म्हटले की, हे सगळं घडतंय कारण राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही, जर हेच सगळं घडत असेल, तर मग आपल्याला कोणत्याही राज्य सरकारची गरज काय आहे. अशा शब्दात न्यायालयानं सरकारलं फटकारलं.
Read also
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर