मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकाराला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नव्या वर्षातील आमदार निधी वाटपाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गेल्या वर्षीचे आमदार निधी वाटपाचे आदेश देखील न्यायालयाने राज्य सरकारला देण्यात आले आहेत. निधीवाटपामध्ये पक्षपाती होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकरांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात अन्याय होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. पण आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकतं माप दिल्याबद्दल भाजप आणि शिंदे गटाच्या मनमानी कारभारावर उच्च न्यायालयाने चाप बसवला आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना निधी वाटपात असमानता म्हणून आोरडणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी सत्तेत येताच त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता स्थानिक विकास निधीचे वाटप कोणत्या निकषांनुसार केले? आणि कोणाच्या खात्यात हा निधी जमा केला? याचे दूध का दूध, पानी का पानी आता व्हायला हवे. अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्ये कपात. ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून फक्त १० कोटी केली. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप सरकार करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…““रोहित पवारांना ‘त्या’ निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनीच षडयंत्र रचला होता”, मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
हेही वाचा…कुणी मागे हटेना..! “हेंबाड्या, मटणकरी, औरंग्या, माकडाची कुंडली,” राष्ट्रवादी अन् मनसेत ‘ट्विट’ वार जोरात
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले