मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या बंडाला २० जून रोजी एक वर्ष पुर्ण झालं आहे. इतिहासातील सर्वात मोठा बंड एकनाथ शिंदे यांनी केला. यावर अनेक चर्चा केल्या जात आहेत. रविंद्र चव्हाण यांच्याकडे बंडाची जबाबदारी दिली होती. या बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
सुरतल्या गेल्यानंतर आमदारांकडील मोबाईल काढून घेतले होते. त्यांना टिव्हीही पाहू दिला नव्हता. गुवाहाटीला पोहोचवल्यावरच आमदारांना टिव्ही बघायला परवानगी दिली गेली. घरच्यांसोबत संपर्क साधण्याची परवानगी दिली. या संपुर्ण ऑपरेशनमध्ये एक छोटी चूक झाली असती, तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. देशभर भाजपची नाचक्की झाली असती. असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यावर नाना पटोले यांनी खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे काम दिल्लीवरून भाजपचे रंगा-बिल्ला कसे करतात हे शिंदे गटाचे आमदार चव्हाणांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. निव्वळ सत्तेसाठी ज्यांच्यासोबत २५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा भाजप किती राक्षसी वृत्तीचा आहे याचेच हे जिवंत उदाहरण. त्यामुळे शिंदेंनी शिवसेना फोडण्याच्या वेळी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा, हिंदुत्व, गळचेपी वैगरेचा आळवलेला राग, हे सर्व थोतांड होतं आणि त्यामागे भाजपचं निव्वळ सत्ताकारण होतं. असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे काम दिल्लीवरून भाजपचे रंगा-बिल्ला कसे करतात हे शिंदे गटाचे आमदार चव्हाणांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
निव्वळ सत्तेसाठी ज्यांच्यासोबत २५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा भाजप किती राक्षसी… pic.twitter.com/boGivhsPm3
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान