मुंबई : रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे स्थान वढू तुळापूरला पहिल्यांदाच जीर्णोद्धारासाठी भरघोस निधी महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला. याचा पक्षाच्या प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे अॅडमिन ज्या आयटी क्षेत्रातून येतात त्या आयटी क्षेत्राचा पाया पवार साहेबांनी घातला. म्हणून जेव्हा राष्ट्रीय पक्ष पुन्हा होऊन दाखवा, असे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरतात तेव्हा त्यांना आवर्जून सांगा की वाघ जेव्हा झेप घेणार असतो तेव्हा तो दोन पावले मागे जातो. नंतर जो झेप घेतो तो नरडीचा घोट घेणारी झेप घेतो. ही झेप घेण्याचा निश्चय आज वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया. पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया. असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी अडथळे अनेक येतील. हिंदुत्वाची गोळी घेऊन कोण आले तर त्यांना आरसा दाखवा. जो शिवछत्रपती यांचा असेल. पुढील मकरसंक्रांतीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. तेव्हा पुन्हा उन्माद माजेल. पण धनुष्यबाण हाती घेतलेले व भुवया उंचावणारे प्रभू श्रीराम हवेत की कुटुंबवत्सल आशीर्वाद देणारे प्रभू श्रीराम हवेत, असे विचारावे लागेल. आज देश आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादीकडे मोठ्या आशेने बघत आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आपला पक्ष आहे. आपण कोणीच या महापुरुषांना पाहिले नाही. परंतु या महापुरुषांच्या विचारांची ज्योत घेऊन ती तेवत ठेवणारा एक व्यक्ती ५०-५५ वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. जेव्हा धार्मिक आणि जातीय विष कालवण्याचा अंधार दाटतो तेव्हा या मशालीच्या उजेडाचा प्रकाश आपल्याला दिशा दाखवेल याकडे पूर्ण देशाचे लक्ष आहे. म्हणूनच ही जबाबदारी खांद्यावर घेऊन पुढील काळात आपण सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत राहूया असे आवाहन करून डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा