मुंबई : मंत्रीपद पाहिजे असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे काम केले पाहिजे. सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. हा एक विश्वास तिथे प्रत्येकानी जर उगाशी बाळगला तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचे चित्र बदलेले. जे सातत्याने मगाशी बरेच जण म्हणाले ना की पहिला नंबर आला पाहिजे सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे. भाषण करून पहिला नंबर येणार नाही. भाषणामध्ये तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला त्याच्यात स्फूर्ती मिळत प्रेरणा मिळते. जोश मिळतो. परंतु बोलणार आणि पण आपण पण किती भागांमध्ये जातो काय करतो. आपण ज्या जिल्ह्यातलं होतं त्या जिल्ह्यात तरी आपण एकोपाठ ठेवलाय का असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हटले.
हेही वाचा…साताऱ्यात दोन राजे भिडले, एकाने नारळ फोडले तर दुसऱ्याने ऑफिस, कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या मनाला दुःख आहे की कधी कधी मी विचार करतो. की ममता बॅनर्जी एकट्याच्या जीवावर पश्चिम बंगाल घेऊ शकते. आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाब अन् दिल्ली काबीज केली. नितीश कुमार देखील बऱ्यापैकी बिहारमध्ये त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये अनेक इकडं या सगळ्या नेत्यांची नावे घेतल्यानंतर त्याच्या सगळ्यात उजवा नेता म्हणून तर आदरणीय पवार साहेबांना आहे. असं अजित पवार म्हणाल्या. तेवढ्यात खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या मारल्या. त्यावरही अजित पवार संतापले. शिट्ट्या मारतात. टाळ्या मारतात. तुम्ही सगळे म्हणतात. पण कधी आपल्या एकट्याच्या ताकदीवर आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये निवडून आणू शकता का ? त्याच्यामध्ये आपणच कुठे कमी पडतो ? आपण विदर्भामध्ये कमी पडतो आपण मुंबईमध्ये कमी पडतो. आज देखील मुंबईच्या आज पंचविसावा वर्धापन दिना पण 24 पूर्ण करून पंचवीस हजार पण करतोय. परंतु अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीये. असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला होता, त्यानिमित्त अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंरतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे १० जूनचा कार्यक्रम आज २१ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार ,खासदार उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले