कोल्हापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांवर भाजपने आरोप केलेल्या कंपनीला पुन्हा आता महायुती सरकारने कंत्राट दिल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी लोक लोकांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी लावला आहे. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान
ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि माझ्या जावयाचा कोणताही संबंध नाही. जर हे कुणी सिद्ध केलं तर राजकारणातून सन्यांस घेऊन. परंतु मंत्रिपदाचाही राजीनामा देईन. असं हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यातच रोहित पवार वारंवार आपल्यावर आरोप करीत आहे. यावर त्यांचं सध्या आमच्यावर प्रेम उफाळत आहे. त्यामुळे त्यांना ते करू द्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“अगोदर आरोप अन् नंतर मुश्रीफांच्याच कंपनीला कंत्राट”, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा*
दरम्यान, ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीने अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवण्यास दिल्याचा आणि मनी लॉंडरिंग झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता.
हेही वाचा…मनसे पुण्यात भाजपचाच गेम करणार ? लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या
त्यासाठी भाजपने पत्रकार परिषदा आणि कोल्हापुर दौरा या माध्यमातून रान उठवलं होतं. आता याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का ? असा सवाल देखील रोहित पवारांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
हेही वाचा…“पेटवलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यंदाची दिवाळी,” रोहित पवार अन् संदीप क्षीरसागर यांचा मोठा निर्णय
हेही वाचा…जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत १६० जणांना अटक, दोन हजार जणांची चौकशी, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक
हेही वाचा…““मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व?” आदित्य ठाकरेंची सदा सरवणकरांवर बोचरी टिका
हेही वाचा…“मग राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या”, शरद पवार गटाने दिलं आव्हान