मुंबई : मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता. पंरतु आमदारांनी आग्रह केला, आणि त्यांनी त्यावर सह्या केल्या. बाकीच्या मंडळींनी देखील सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद घेतलं. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा. आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
अजित पवार यांनी ज्यावेळेस पासून महाराष्ट्र राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात प्रवेश केला. त्यावेळेसपासून पाहिलं तर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील पीडीसीसी बँकेमध्ये संचालक म्हणून सुरुवातीला काम सुरू केले. परंतु ही बँक आर्थिक दृष्ट्या सुदृढ करण्याचा अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्याला अनिश्चित केलं. हे सुद्धा जिल्ह्यातील जनतेला चांगलंच माहित आहे. नंतरच्या काळामध्ये आदरणीय अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडे पुणे शहराकडे लक्ष दिले आणि या दोन्ही शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. म्हणूनच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा विकास हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा खंडामध्ये या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक नंबर येतो. असं रिप्बलिकन पार्टी ऑफ खरात पक्षाचे प्रमुख सचिन खरात यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे शहराचा विकास तर मोठ्या प्रमाणावर त्याला याचमुळे पुणे महानगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली हे सुद्धा राज्यातील जनतेला माहीतच आहे. नंतरच्या काळामध्ये अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्यांमध्ये सुद्धा विकासाच मोठा प्रमाणावर काम केले हे सुद्धा राज्यातील जनतेला माहित आहे. आत्ताच कोरोनाच्या कोरोनाच्या काळामध्ये अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना जे काम केलेला आहे. अत्यंत चांगलं काम केलेलं आहे हे सुद्धा राज्यातील जनतेला माहीतच आहे. यामुळे सुद्धा अजित पवार यांचा चांगला कामाचा उल्लेख हा अत्यंत चांगल्या प्रकारे केलेल्या दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांना जर पक्षाने खरंच चांगलं काम करण्याचं जर पद दिलं तर अजित पवार राज्यांमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंभर आमदार येणार काळामध्ये निवडून आणतील हा आमचा विश्वास आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले