मुंबई : मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता. पंरतु आमदारांनी आग्रह केला, आणि त्यांनी त्यावर सह्या केल्या. बाकीच्या मंडळींनी देखील सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद घेतलं. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा. आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांसमोरच आपली भूमिका मांडली तर त्यांनी वंचित आणि बीआरएस पक्षाबाबतही भाष्य केलं.
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
उद्याच्या निवडणुकीत बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, हे लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडीमुळे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला फटका बसला आहे. काही ठिकाणी पाच ते दहा हजारांच्या मतांनी काठावर निवडून येणारे आमदार आणि खासदार अडचणीत आले आहे. त्यामुळे कुणीही गाफीर राहू नका. असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला
एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकरांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बोलावलं होतं. केसीआर यांंचं तेलंगणात जेवढं लक्ष नाही, तेवढं महाराष्ट्रात आहे. केसीआर हे आजी, माजी आमदारांना फोन करून संपर्क साधतात. निवडणुकीत कितीही चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न केला तरी हे बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजेत असंही अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल