औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज कन्नड येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला असंख्य लोकं हजर झाले. तर या लोकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र शिंदेंचा कार्यक्रम संपल्यानंतर लोक जेवणावर तुटून पडलीत. त्यामुळे या कार्यक्रमात अन्नाडी प्रचंड नासाडी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अंतर्गात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थींना ५५१ कोटी रूपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिंदे गटातील अनेक मंत्री, आमदारांसह जिल्ह्यातील जवळपास ७० ते ८० हजार लोक कार्यक्रमासाठी आली होती. या सर्व लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र लोकांनी आपल्या ताटात प्रमाणापेक्षा जास्त अन्न घेऊन अन्नाची नासाडी केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, या सभेला पैसे घेऊन गर्दी आलेली नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ५४५७ कोटी रूपयांचं वाटप करण्यात आलं आहे. सहा लाख लोकं हा कार्यक्रम ऑनलाईन पाहत आहेत. अतिशय चांगली तयारी केली आहे. आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागयचं. आता आमचं सरकार तुमच्या दारी आलं आहे. असंही शिंदेंनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…