मुंबई : काॅंग्रेस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत तब्बल 18, 901 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीतील आणि काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण व फटाक्याची आताषाबाजी करीत जल्लोष साजरा केला होता. त्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानभवन मुंबई येथे विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल! मनसे आक्रमक
त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझे पती दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यानंतर कोल्हापुरातील जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. या शपथेसोबतच माझ्यावर असलेल्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव असून पुढील काळात आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम माझ्या हातून होईल याची मी ग्वाही देते.
राणा दाम्पत्य मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार; उद्धव ठाकरे CM झाल्यापासून राज्याची दुर्दशा
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकरजी, आमदार संजय जगतापजी, आमदार संग्राम थोपटेजी, विधानभवनचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“राजद्रोहाच्या कलमाचा फेरविचार झाला पाहिजे, नाहीतर रद्द करायला हवा”; जितेंद्र आव्हांडाची प्रतिक्रिया
भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर काॅंग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची प्राण प्रतिष्ठा प्रणाला लागली होती. मात्र यामध्ये कोल्हापुर उत्तर भागाचा गड पालकमंत्री सतेज पाटील यांना राखण्यात यश आलं. सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावडा परिसरातील मतदार काय करणार याविषयी उत्सुकता होती. मात्र मतदारांनी सतेज पाटील यांच्याकडे कल दिला.
Read also:
- तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
- भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
- ” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
- “माणसं जमा करायला शिवसेनेला राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का?”; शिवसेनेच्या टिझरमध्ये राज यांच्या सभेतील दृश्य
- राजद्रोहाच्या कलमामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे; छगन भुजबळ