ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात मागील काही दिवसात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. या प्रकरणावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदारीकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शिंदे अन् भाजपमध्ये मोठा वाद निर्माण झाला. यातच आता शिवसेनेच्या जाहिरातीवरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये धुसफुस निर्माण झाली होती. यावर आता श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
वादावर पडदा पडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. अनेक भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. ते सर्व एकत्रच झाले. उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यकर्ते कायम उत्सुक असतात. ते त्यांच्या स्तरावर काही ना काही करत असतात. तो दोन्हीकडील कार्यकर्त्यांसाठी भावनिक मुद्दा असतो. मात्र, आजच्या उपस्थितीवरून सर्व चित्र स्पष्ट आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्ते समजदार असतात. असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
दरम्यान, खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितृष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजप-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे. असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का