पुणे : राज्यात गेल्या काही वर्षाभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. महाविकास आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये यावरून राज्यात मागील काही वर्ष अनेक वाद-विवाद झालेत. आता यावरून राष्ट्रवादीमुळे या सर्व निवडणुका रखडल्या असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…रिट्विस्ट…! “आर्यन खान ला सोडण्यासाठी वानखेडेंनी शाहरूख खानकडून २५ कोटी घेतले,” सीबीआय
राष्ट्रवादी काॅंग्रेसने या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी प्रभाग वाढविले, जागा वाढविल्या, वार्ड तयार केलेत. आणि या सरकारने ते रद्द केलेत. त्यामुळे यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असून ती कोर्टात आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी काॅंग्रेसने कोर्टात केलेल्या विविध केसेसमुळे प्रलंबित आहेत. अशी टिका बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराची फडणवीसांशी जवळीक, पिंपरीच्या कार्यक्रमात…
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणात बदल झाला आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजप-शिंदे युती अशी लढत होण्याची शक्यता आहे. यातच महाराष्ट्रात सत्तासंघर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…डीआरडीओ कुरूलकर प्रकरणात नवी माहिती, वायुदलाचा अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये
हेही वाचा…“..तर त्यांना अजीबात सोडणार नाही, सगळं बाहेर काढू, “देवेंद्र फडणवीसांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…“पुणे जिल्ह्याचं विभाजन करून त्याला ‘शिवनेरी’ नाव द्या,” महेश लांडगेंची फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“मोदीने केलेल्या कामावर विश्वास असेल तर भाजपने बॅलेट पेपर वर निवडणुका लढव्याव्यात”