मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी पाच न्यायाधीशांच्या घटनीपीठांकडे युक्तिवाद केले आहेत. त्यामुळे आता मागील काही दिवसापासून वाट पाहत असलेल्या प्रकरणाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यावर आता विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यावर आता ठाकरे गटाचे वकिल अनिल देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
सत्तासंघर्षावरील निकाल उद्या देणार असल्याची घोषणा आताच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी केली आहे. या निर्णयाचा संपुर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. भारताची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय उद्या जाहीर होईल. मी सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. उद्याही मी दिल्लीत असेन. मला जी जबाबादारी दिली आहे. ती जबाबदारी मी पार पाडेन. अर्थातच अपेक्षा आहेत. उद्या सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाला धरून आणि भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल असा आम्हाला विश्वास आहे. असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष नार्वेकरांकडे देऊ शकतं. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं घडलं तर एकनाथ शिंदेंसाठी हा दिलासा १६ आमदारांना अध्यक्ष पात्र ठरवू शकतात. तर खंडपीठ १६ आमदारांचा निकाल, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांकडे देऊ शकतं. जर असं घडलं तर उद्धव ठाकरे हा दिलासा झिरवाळ हे १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतात. असं निकालआधी घडण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?