मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील विधान परिषदेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनिषा कांयदे यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलावर असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता ठाकरे गटाकडून विधान परिषेदत मनिषा कायंदे यांच्यावर कारवाईची मागणी करणार अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मनिषा कायंदे यांनी प्रवेश केल्याने त्यांच्या आमदाराकीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातच आता मनिषा कायंदे ह्या अपात्र होणार असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यासाठी विधान परिषदेत ठाकरे गट कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. विधान परिषदेतील आता सदस्यसंख्या समसमान असल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी दावा ठोकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
दरम्यान, मनिषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं जाहीर केलं असलं तरी ती अपात्रता मानली जाऊ शकत नाही. कारण त्यांचा दावा असेल की त्या शिवसेनेतच आहेत, शिवसेना सोडली नाही. पण विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यासंर्भात अंतिम निर्णय घेतील. दहाव्या परिशिष्टानुसार त्या अपात्र ठरतात की नाही, याबाबत नीलम गोऱ्हे सभागृहाच्या सभापती म्हणून निर्णय घेतली असं वकील उज्जवल निकम यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”