पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात केलेल्या बंडाला आज एक वर्ष पुर्ण होत आहे. २० जुन २०२२ रोजी विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदा सुरत त्यानंतर गुवाहाटी,गोवा आणि महाराष्ट्र असा आपल्या ५० आमदारांना घेऊन प्रवास केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात विरोधी पक्षांतील नेत्यांकडून गद्दार दिवस साजरा केला जात आहे.
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्षपुर्ती होत असून राष्ट्रवादीकडून संपुर्ण राज्यात गद्दार दिवस साजरा केला जात आहे. गद्दार दिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी मुंबईत ताब्यातही घेतले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून खोके दिवस साजरा केला जात आहे. आज ठिकठिकाणी पन्नास खोक्क्यांचा प्रतिकात्मक पुतळाही उभारण्यात येत आहे.
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून २० जून २०२३ दिवस हा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आज राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”