मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या घटनेत अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच आता २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“कोणीही जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला तर..”, अजित पवारांचा सर्वपक्षीयांना इशारा
संजय राऊत म्हणाले की, बेरोजगारी, महागाई आणि अदानी समुहाच्या मुद्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लोकं प्रचंड चिडली आहेत. ते मतदान करण्याची संधी कधी मिळेल? याची वाट पाहत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही. शिंदे गटाकडे मतंच नाहीत. ४० आमदार हीच त्यांची ताकद आहे. भविष्यात यापैकी किती आमदार शिंदे गटात राहतील ? हे तुम्ही पाहालचं. ४० पैकी २८ आमदारांचा एक पाय भाजपमध्ये आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…ठाकरे गटाचे एकटे आमदार रविंद्र वायकर सरकारला नडले..! शिंदे सरकारला बसला जोरदार झटका
एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या संपुर्ण राज्यात सभा होत आहेत. या सभेला अजित पवार, नाना पटोले आणि यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. परंतु त्याआधी संभाजीनगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळं वातावरण बिघडेल गोंधळ होईल. असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. असं त्यावर बोलतांना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
Read also
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“सुषमा अंधारेंबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी”, सुप्रिया सुळे