मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. यावरून विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनावरून राज्यभरात भाजपाने निषेध आंदोलन केले. तसेच आज निषेध म्हणून अधिवेशनावर बहिष्कार टाकत विधासभेच्या बाहेर प्रतिविधानसभा भरवली गेली.
कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
दरम्यान, अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या सत्रात अधिवेशनाच्या दुसऱ्या सरकारकडून अनेक महत्वाचे ठराव संमत करण्यात आले. भाजप आमदारांच्या गैरहजेरीतच सभागृहाचं कामकाज सुरु होतं. दरम्यान, सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काही वेळासाठी सभागृहाबाहेर आले होते.
“सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”
यावेळी भाजप आमदार आणि पटोले यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. पटोले प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना, भाजप आमदारांनी पटोले यांच्यासमोर, ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है,’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विधानसभेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर, नाना पटोलेंनी भाजप नेत्यांना काय उत्तर देतात, याकडे माध्यमांचे लक्ष होते. मात्र, ते प्रत्युत्तर न देता निघून गेले.
मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
आज दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आत्तापर्यंत कधीही पहिली गेली नव्हती, एवढी आक्रमकता पाहायला मिळाली.
Read Also :
- “पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री
- “विमा कंपन्या आणि सरकारचं साटंलोटं; त्यांनी सरकारला लॉलीपॉप दिलं आहे.”
- “फडणवीस सभागृहात एक बोलले आणि बाहेर एक वेगळंच बोलले”
- “…तर भाजपचे १२ नाही १८ आमदार निलंबित झाले असते”, निलंबनावर अजित पवारांचं भाष्य
- राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!