मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आत्तापर्यंत कधीही पहिली गेली नव्हती, एवढी आक्रमकता पाहायला मिळाली. दरम्यान या दोन दिवसांत एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीनंतर, या सर्व घटनाक्रमावर, तालिका अध्यक्ष म्हणून ज्यांनी हे अधिवेशन गाजवले, त्या भास्कर जाधवांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी आक्रमक आमदारांनी, पुढे हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. एका आमदाराने तालिका अध्यक्षांचा माईक ओढला, तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली, असा आरोप या आमदारांवर केला गेला असून, या झालेल्या गदारोळात धक्काबुक्की देखील झाली असल्याचा आरोप केला गेला आहे; परिणामी या १२ आमदारांचं १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
यावर आज बोलताना त्यांनी, “भाजपला ही ओढवलेली परिस्थिती टाळता आली असती. हाताची टाळी कधी एका हाताने वाजत नाही. त्यांनी माझ्याशी वाद घालण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांनी समोर असलेल्या सत्ताधाऱ्यांसोबत वाद घालायला हवा होता. ज्यावेळी भुजबळ यांनी आरक्षणाबद्दल ठराव मांडला, त्यावेळी त्यांना काही सुचना द्यायच्या असतील, काही हरकत घ्यायची असेल, तर नक्कीच त्यांनी बोललं पाहिजे. पण, अधिवेशनाच्या सुरुवातीपासून फडणवीसांचं काय बिनसलं होतं, माहिती नाही,” असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेत्याला लगावला आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
तसेच, फडणवीस सुरुवातीपासूनच इतके आक्रमक झाले होते की, ते त्यांच्यासमोर कुणालाच बोलू देत नव्हते. मला सगळं माहिती आहे, मंत्री काय बोलणार आहेत, मी जाणतो, अशा अविर्भावात ते बोलत होते, हे कोणत्याच संसदीय कामकाजात बसत नाही. भुजबळांनी शांतपणे आपला ठराव मांडला. पुराव्यानिशी उत्तरं दिली. सर्व सदस्यांनी सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं. मात्र, फडणवीस काही ऐकून घेण्याच्या तयारीतच नव्हते,” असं म्हणत, “सभागृहात फडणवीस बोलले, आमचे दोन-चार लोकं चुकीचं बोलले. याबद्दल मी माफी मागतो. मात्र, बाहेर सभागृहातून बाहेर पडताच त्यांनी, मी त्यांच्या आमदारांना शिवीगाळ केली असं सांगितलं. आता ते सभागृहात एक बोलतात आणि बाहेर एक वेगळंच बोलतात,” अशी टीका करत, फडणवीसांचा दुटप्पीपणाची भूमिका त्यांनी दाखवून दिली.
Read Also :
- “विमा कंपन्या आणि सरकारचं साटंलोटं; त्यांनी सरकारला लॉलीपॉप दिलं आहे.”
- “…तर भाजपचे १२ नाही १८ आमदार निलंबित झाले असते”, निलंबनावर अजित पवारांचं भाष्य
- राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
- कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
- “सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”