मुंबई : केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या माणसांना त्रास देण्याचा काम पहिल्यापासून सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही काही केलं तरी आम्ही खचणार नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. कालच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस आली. त्यानंतर ते बोलत होते.
“शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”
खासदार संजय राऊत यांना तुरूंगात टाकलं, त्यानंतर वैभव नाईकांना नोटीस आली, त्यांची चौकशी केली. त्यानंतर माझी देखील एसीबीने नोटीस देऊन चौकशी केली. त्या चौकशीला पुन्हा एकदा बोलवलं आहे आणि आता उद्धव ठाकरे यांच्याशी प्रमाणिक राहिल्याने नितीन देशमुख यांना देखील नोटीस देण्यात आली आहे. आमचं दुर्दैव आहे. परंतु आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अन् भविष्यात निश्चितपणे ह्या सर्वांना फटकारले. अन् त्यांनाही अशाच प्रकारे पायउतार व्हावं लागेल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
त्यांच्यासोबत कुणी न गेल्यामुळे आमच्या सारख्या नेत्यांना त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नितीन देशमुख यांच्याप्रमाणे माझ्याबाबतीही खोटी तक्रार देण्यात आली आहे. त्याला मी तर ओळखतही नाही. आता त्याच्याविरोधात देखील त्याला नोटीस देण्याची सुरूवात केली आहे. अशा लोकांना देखील आम्ही आता त्रास देणार असा आमचा संकल्प आहे. असंही राजन साळवी म्हणाले.
Read also
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
- “उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
- “संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
- “ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास..”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”