वर्धा : अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, तसेच सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्रधारकांना २५ ते ३० लाख रूपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, अशा इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या एका शेतकऱ्यांनी तब्बल २५१ दिवसानंतर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सागाच्या पानावर, स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून शेतकऱ्यांनी आपल्या वेदना मांडल्या. त्यामुळे या घटनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय. अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटरमधअये येणाऱ्या जुनी सुरवाडी, भूताबर्डीत प्रजासत्ताक दिनाच्या रात्री ही घटना घडली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का : अजित पवारांचा प्रमुख शिलेदार खासदार अमोल कोल्हेंच्या ‘गळाला’?
गेल्या अनेक वर्षापासून अप्पर वर्धा धरणग्रस्त आपल्या मागण्यांसाठी उपोषण करीत आहेत. अलिकडेच मंत्रालयात देखील अप्पर धरणग्रस्तांनी सरकारच्या विरोधात रोष पत्कारून मंत्रालयाच्या जाळीवर उड्या टाकल्या होत्या. त्यानंतर सरकारने तात्पुरत्या स्वरूपाची मदत दिली होती. मात्र त्यांच्या संपुर्ण मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि याचसाठी गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गोपाल दहिवडे या शेतकऱ्यांने उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“लढाई जिंकलीय, संघर्ष अजूनही बाकीय,” सरकारच्या अध्यादेशावर १६ तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत, काय होणार ?
तब्बल २५१ दिवसांपासून आंदोलन करीत असतानाही राज्यातील निष्ठूर सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याचे पाहून हताश झालेल्या वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गोपाल दहिवडे या शेतकऱ्याने उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्रधारकांना २५ ते ३० लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी, तत्काळ प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, सर्व शेतकऱ्यांना बाजारभावानुसार अनुदान मिळावे अशा या हक्काच्या मागण्या होत्या.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा ‘अध्यादेश’ निघाताच गुणरत्ने सदावर्तेंचं मोठं विधान, कोर्टाची लढाई पुन्हा सुरू ?
कुठेही अवास्तव मागण्या नसतानाही सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा एका शेतकरी बांधवाला या महायुती सरकारमध्ये आपला जीव द्यावा लागला. सागाच्या पानावर, स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून शेतकरी आपल्या वेदना मांडत आला आहे. या शेतकऱ्यानेही चिठ्ठी लिहून सरकारला आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. हे चिठ्ठी शिंदे- फडणवीस- अजित पवार यांच्या महायुती सरकार विरोधात लेखी पुरावाच आहे. इतका सबळ पुरावा असताना या शेतकरीद्रोही सरकारविरुद्ध गुन्हे का दाखल केले जाऊ नयेत? असा सवाल देखील यानिमित्ताने विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केलाय.
तब्बल २५१ दिवसांपासून आंदोलन करीत असतानाही राज्यातील निष्ठूर सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याचे पाहून हताश झालेल्या वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गोपाल दहिवडे या शेतकऱ्याने उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे.
अमरावती जिल्ह्याच्या वरुड…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘ती’ शपथ खरी करून दाखवली”, मराठा आरक्षणावर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…कुख्यात गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, म्हणाले…अशा प्रवृत्ती
हेही वाचा…“मराठा आंदोलनाला मोठं यश..! सरकारने ‘सगेसोयरे’ “या” शब्दाची व्याख्या काय केलीय ?” वाचा सविस्तर
हेही वाचा…“छगनरावांनी आता तातडीने राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,” शरद पवार गटाने भुजबळांना डिवचलं
हेही वाचा…” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…