मुंबई : मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईत जात असून सरकारने दिलेला शब्द पाळणार असल्याचं मला समजत आहे. तसेच सरकार मराठा समाजाला न्याय कशा पद्धतीने सरकार देणार आहे, त्याकडे उत्सुकतेने पाहत आहे. मराठा आरक्षणाबाबत नेहमी सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. मराठा समाजाला टिकणारं घटनात्मक दृष्टया आरक्षणच देता येईल. अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील वाशीत दाखल झाले आहेत. त्यावर त्या बोलत होत्या.
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षण देतांना कुठल्याही वंचितांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. अशी समजूतदाराची भूमिका सरकार घेईल, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. कुणीही लगेच हो म्हणून आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही. त्यामुळे त्यांना घटनात्मकदृष्ट्या आरक्षण देता येईल. मराठा समाजाला न्याय द्यायचं असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाची ही लढाई वंचिताची असून मी देखील वंचितासाठी लढत आहे. त्यामुळे आरक्षण देतांना कुठल्याही वंचितांना त्रास होईल असा निर्णय घेतला नाही पाहिजे. अशी समजूतदाराची भूमिका घेतील. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*
दरम्यान, ओबीसी समाजावर अन्याय झालं असं लक्षात आलं तर राज्यात ओबीसींचं देखील आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घेईल. आम्ही जाहीर सभेतून आमची भूमिका मांडत आलो आहे. तसेच आमचा यालवरक विरोध देखील करत आहे आणि तो करणारच, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठे वाशीत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल होण्याआधीच सरकारचं शिष्टमंडळ वाशीत दाखल झाले असून राज्य सरकारचं नवीन जीआर तसेच राज्य मुद्रा देखील जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या जीआरचं वाचन मनोज जरांगे पाटील वाशीतल्या सभेत करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
हेही वाचा..मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..