मुंबई : केंद्राच्या ३ नवीन कृषी कायद्यांविरोधात, दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता जवळपास ७ महीने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या दरम्यान, राष्ट्रपतीव्दारा नियुक्त, देशभरांतील राज्यपालांना निवेदन देण्यात देण्यात आले. किसान मोर्चाकडून या मोर्चाला, “शेती वाचवा, लोकशाही वाचवा” असे नाव देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर राज्यात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनदेखील, मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून, “या कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली, पत्रव्यवहार केला. मात्र, एवढे करूनही मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आलेले नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
अशीच तत्परता राज्यपाल, १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात कधी दाखवणार?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांऐवजी, राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व इतर नेते उपस्थित होते. यावेळी, या सर्वानी त्यांच्याकडे, या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले. तसेच, राज्य शासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असाही आग्रह धरला.
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
यावर, आता भाजपच्या अतुल भातखळकरांनी ट्विट करत टीका केली असून, “काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागत आहेत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच..”, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. यावर आता राजू शेट्टींनीही प्रत्युत्तर दिले असून, “सत्ता नसल्यानं भाजपचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये, असा हल्लबोल त्यांनी केला आहे.
Read Also :
- विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांची मान्यता रद्द करू – वर्षा गायकवाड
- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, भाजपकडून थेट अमित शाहांना पत्र
- ठाकरे सरकारचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय! केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही
- आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना ना उपमुख्यमंत्रीपद ना प्रदेशाध्यक्ष पद!
- “मी खासदारकी सोडली, विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडली; त्यामुळे मला खुर्चीची चिंता नाही”