मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. यावर राज्यातील ओबीसी समाजाने विरोध दर्शविला असतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणातील एकही मराठा ओबीसी प्रमाणपत्र घेणार नाही अस विधान केलं होतं. यानंतर शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी देखील अशाच प्रकाराचं विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना चांगलाचं फटकारलं आहे.
हेही वाचा…“..म्हणूनच राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामा दिला”,भुजबळांचा गड गडगडला, खंदे समर्थकाने दिला राजीनामा
९६ कुळी मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत. कोकणात आमच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही हे रामदास कदम यांचे विधान प्रचंड जातीयवादी आहे. जो माणूस पोटजातीतल्या लोकांबद्दल इतक्या द्वेषभावनेने बोलतो. त्याच्या मनात इतर जातसमुदायांच्याबद्दल किती तिरस्काराची भावना असेल? असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकर जर आघाडीसोबत येत असतील तर…,”काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांचं मोठं विधान
राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. त्याला माझा विरोध आहे. विदर्भात कुणबी आणि मराठा चालतं. परंतु कोकणात मराठा आणि कुणबी असा चालत नाही. हे मनोज जरांगे पाटलांना माहिती नाही. त्यांचा तेवढा अजून अभ्यास नाही आहे. त्यामुळे कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. हे मी दाव्याने सांगतो. असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची आ’त्म’ह’त्या’, राज्यात एकच खळबळ
दरम्यान, कोकणातील ९६ कुळी मराठा वेगळे असून ते कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा तितका अभ्यास नाही. असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचा नाही.त्यांनी घेऊ नये. परंतु मराठ्यांच्या आड येता कामा नये. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं.
96कुळी मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत कोकणात आमच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही हे रामदास कदम यांचे विधान प्रचंड जातीयवादी आहे. जो माणूस पोटजातीतल्या लोकांबद्दल इतक्या द्वेषभावनेने बोलतो त्याच्या मनात इतर जातसमुदायांच्याबद्दल किती तिरस्काराची असेल? @iramdaskadam @ShivSenaUBT_
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शाब्दिक फसवाफसवी करून सरकार आंदोलकांच्या भावनांशी खेळतंय का ? २४ तासात जाहिरातीची भाषा बदलली
हेही वाचा…शिंदे गटाचा दसरा मेळावा अडचणीत..!शिंदेंना रावण दहनाचा कार्यक्रम तिथीनुसार का नकोय? मंत्र्यांकडून मंडळांवर दबाव
हेही वाचा…तेलंगणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या ‘या’ दोन नेत्यांचा कस लागणार ? पक्षानी सोपवली मोठी जबाबदारी
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांसाठी आघाडीसोबत आले पाहिजे,” काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिले युतीचे संकेत
हेही वाचा…वाद वाढला…! “कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”,नारायण राणेंनंतर शिंदे गटाच्या नेत्याचा दावा