मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीवर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देखील टिका करण्यात आली. यातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”
पृथ्वीराज चव्हाण यांचं त्यांच्या पक्षातील स्थान काय आहे, हे आधी त्यांनी तपासून पाहावं. असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसेच ते ए आहेत की बी, की सी,डी आहेत. ते आधी त्यांनी तपासून पाहावं. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना विचारलं तर ते त्यांना खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?
तर राष्ट्रवादीबद्दल चुकीचे विधाने करून पृथ्वीराज चव्हा हे भाजपच्या एजंटसारखे वागून मित्रपक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. खरे म्हणजे त्यांचा काॅंग्रेस पक्षही त्यांना आता गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांच्या विधानांनी काही फरक पडणार नाही. असं राष्ट्रवादीचे नेते फिडेल क्रोस्टो यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांचं पक्षातील स्थान हे नंबर १ आहे. अन् ते शेवटपर्यंत नंबर १च राहणार. पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते आहेत अन् राहतील. भाजपच्या तानाशाही विरोधात लढण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे. अस काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“१६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे”, विधानसभा अध्यक्ष
हेही वाचा…राष्ट्रवादीचा पुढचा वारसदार कोण? शरद पवारांनी थेट नावचं सांगितली, वाचा यादी
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता