रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात वचर्स्व कायम राखलं आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४१ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने झेंडा फडकावला आहे. तर दुसऱ्या बाजूला सिंधूदूर्गात नितेश राणेंचा करिश्मा दिसून आला आहे.
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाने ४१, अजित पवार गटाने ५ , ठाकरे गटाला ७, शेकापला ३, ग्रामविकास आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं वचर्स्व कायम आहे.
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजपने मोठी बाजी मारली आहे. जिल्ह्यात राणेंचा करिश्मा कायम असून पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. विजयी उमेदवार आमदार नितेश राणेंना भेटण्यासाठी कणकवली येथील राणेंच्या निवासस्थानी आले आहे. यातच सिंधूदुर्गात ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. आचरा ग्रामपंचायत भाजपकडे गेली असून वालावलामध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल