नवी दिल्ली : १३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरूणांनी धुराचे लोट पसरवले. २२ वर्षापुर्वी १३ डिसेंबरच्या दिवशीच संसदेवर हल्ला झाला होता. लष्कर एक तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्याच दिवशी ही घटना घडली.ज्यानंतर एकच गदारोळ झाला. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरूणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा दलांना त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
संसद हल्ला प्रकरणातील आरोपी १ ते दीड वर्षापासून फेसबुकवर एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी भगतसिंह नावाचा ग्रुप तयार केला होता. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे तीन दिवसांपुर्वी दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर संसदेवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेतील प्रेक्षक पासवर निर्बंध आणले. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
संसदेत खुसखोरी करणाऱ्या तरूणांचे आम्ही समर्थन करत नाही, असं खासदार संजय राऊ यांनी म्हटलंय. सुरक्षा भेदून कोणी कुठेही घुसू शकतं अशी देशाची परिस्थिती आहे. असा टोलाही राऊतांनी लगावला. यातच संसद घुसघोरी प्रकरणात सर्व संशयितांना दुपारी दोन वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. राजधानी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामधअये दुपारी दोन वाजता हजर केले जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक