नागपुर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांवरून वाद सुरू झाला. नवाब मलिक सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसल्याने विरोधकांनी जोरदार टिका केली. त्यानंतर नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं. त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी पुन्हा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?
आमदार नवाब मलिक यांनी आपली भुमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांनी पाठिंब्याचे शपथपत्र दिले असल्याचे जे बोलत आहेत, त्यांनी ते कोणीही दाखवावे असे आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. मलिक यांच्याबाबतीच भाजपचा गैरसमज झाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठविले पण आता हा विषय संपला असून प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप सिध्द झालेले नाहीत. मात्र नवाब मलिक यांना आरोपामुळे तुरूंगात जावे लागले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात त्यांना घेऊ नये ही भाजपची भूमिका असल्याचं अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा...राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री
दरम्यान, सभागृहात झालेल्या गदारोळामुळे नवाब मलिक आता सभागृहात गैरहजर राहणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तब्येत ठिक नसल्याने नवाब मलिक विधानभवनाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे नवाब मलिकांनी सभागृहात न येण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान