मुंबई : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काॅंग्रेसचे विदर्भातील माजी आमदार आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यावर आता आशिष देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
आशिष देशमुख यांना काटोल आणि सावनेरमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर काटोल किंवा सावनेर मधून मी अपक्ष जरी लढलो तर या भागातील जनता मला निवडून देईल. याची खात्री आहे. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार मतदार संघ निवडणे योग्य राहिल. फक्त एका विधानसभा क्षेत्राचाच नव्हे तर मी नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन संपुर्ण विदर्भाचा विचार केला आहे. विदर्भाचे हित बघून माझी पुढची राजकीय वाटचाल ही त्या आधारावर असेल. असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काॅंग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी, बलिदान दिले. महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते मात्र, स्वांतत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाही. त्यांना जो आवडत नाही. त्याला ते दुर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वत: ला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काॅंग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे वजन वाढले तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. असंही त्यांनी म्हटले आहे.
विदर्भाचे व्यापक हित बघून पुढची राजकीय वाटचाल ठरविणार..!#विदर्भ #Vidarbha #नागपूर #nagpur pic.twitter.com/LGFE5p9wzT
— Dr. Ashishrao R. Deshmukh (@AshishRDeshmukh) May 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका