औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज कन्नड येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक लोकं कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र लोकं आणण्याशिवाय प्रत्येक अधिकाऱ्यांना पैसे देऊन लोकांना आणण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तनाने-धनाने मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रूपये देण्याचे आदेश सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते. कांद्याला जाहीर झालेले अनुदान कुठे आहे. कापसाला भावाचा पत्ता नाही. बी बीयाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर ब्र काढला नाही. आणि मोदी किती भारी आहेत हे आम्हाला कर्नाटकात दिसलेच आहे. इथे पण कर्नाटकची पुनरावृत्ती अटळ आहे. असं दानवेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अंतर्गात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थींना ५५१ कोटी रूपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिंदे गटातील अनेक मंत्री, आमदारांसह जिल्ह्यातील जवळपास ७० ते ८० हजार लोक कार्यक्रमासाठी आली होती. या सर्व लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र लोकांनी आपल्या ताटात प्रमाणापेक्षा जास्त अन्न घेऊन अन्नाची नासाडी केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, या सभेला पैसे घेऊन गर्दी आलेली नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमात ५४५७ कोटी रूपयांचं वाटप करण्यात आलं आहे. सहा लाख लोकं हा कार्यक्रम ऑनलाईन पाहत आहेत. अतिशय चांगली तयारी केली आहे. आजपर्यंत जनतेला शासनाच्या दारी जावं लागयचं. आता आमचं सरकार तुमच्या दारी आलं आहे. असंही शिंदेंनी म्हटलं.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ‘तनाने-धनाने’ मदत केली. लोकं आणण्याशिवाय प्रत्येक तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यक १२ हजार आणि तलाठ्याला ६ हजार रुपये देण्याचे ‘आदेश’ सुटले होते. हे लाभार्थी वर्षभरापासून या मदतीच्या प्रतीक्षेत होते. (१/२)
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं