बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, आज बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, “महाविकास आघाडीचं हे सरकार ५ वर्षे टिकेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. “या सरकारमध्ये योग्य समन्वय असून, ते अत्यंत व्यवस्थित चाललं आहे, याच्या समन्वयाची जबाबदारी ६ नेत्यांवर आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आरबीआयचा निर्णय; आता नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक
“कुठलंही सरकार असूदेत, चालवताना प्रश्न निर्माण होतातच, हे प्रश्न समोर येतात, तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी, अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने ६ सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली गेली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात-अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे-सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार-जयंत पाटील आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
आता आमदार-खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक, आरबीआयचा आदेश; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
“सरकारच्या कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी, हे आमचे ६ सहकारी एकत्र बसतात, चर्चा करतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यांच्यामुळे सरकारमध्ये समन्वय आहे आणि याच पद्धतीने पुढे जाण्याची भूमिका सर्वांची भूमिका राहिली, तर सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, यात शंका नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- शिक्षणमंत्र्यांच्या महत्वाच्या आश्वासनानंतर, नेट-सेट पीएचडी पात्रताधारकांचे आंदोलन मागे
- अनिल देशमुखांसह एका निकटवर्तीच्या अडचणी वाढणार? वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी…ईडीचा कोर्टात धक्कादायक दावा
- “आता अविनाश भोसले-अजित पवारांचे संबंध, काका सामन्यातून जाहीर करतील”- गोपीचंद पडळकर
- “सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही”
- आंबिल ओढा प्रकरण : महापालिका आयुक्त फडणवीसांच्या भेटीला! महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण