जळगाव : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी खडसे कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या कुटुबीयांना १३७ कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
एकनाथ खडसे यांनी काहीतरी चुकीचे अवैध काम केले असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचित केले आहे. खडसे भाजपमध्ये असताना आणि भाजपचे मंत्री असतांना एकनाथ खडसे यांनी काही तरी केले म्हणूनच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागले. असं उदय सामंत यांनी जनरल मोटर्सच्या आंदोलक कामगारांना भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
दरम्यान, उदय सांमत यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबाबतही भाष्य कलेलं आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी घेतली असून, ते देणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले, पण नंतरच्या सरकारला ते टिकवता आले नाही. असंही उदय सामंत यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’
हेही वाचा…“शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? खुलासा करावा”, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?