नाशिक : मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जायकवाडी धरण पाणी प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणातपाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. मराठवाडा पाणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थिगिती नाकारली असून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखला आहे. त्यानुसार आता जायकवाडी धरणात ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा २० ऑक्टोबर २०२३ रोजीचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा निर्णय कायम आहे. आज मराठवाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, शेतकरी अडचणीत आहेत, पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
दरम्यान, मागील काही दिवसापासून जायकवाडी पाणी प्रश्नावरून राज्यातील सत्ताधारीच पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगताना दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावर मराठवाड्याला पाणी न सोडण्याचा ठरावही मंजूर केला होता. त्याला भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी विरोध केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन